मनोरंजन 

..आणखी एका कलाकारानं ‘द कपिल शर्मा शो’ ला ठोकला रामराम

          छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो ‘द कपिल शर्मा शो’ अनेक वर्षांपासून लोकांच मनोरंजन करत आहे.
या शोमधील अनेक जुन्या कलाकारांनी शोला रामराम ठोकला होता. त्यामुळे अनेक नव्या कलाकारांनी शोमध्ये स्थान मिळवल आहे. काही दिवसांच्या ब्रेकनंतर या शोने गेल्या वर्षी टीव्हीवर कमबॅक केलं होतं. सप्टेंबरमध्ये शोचा नवा सीजन सुरु करण्यात आला होता.

या शोच्या प्रोमोमध्ये अभिनेता कॉमेडियन कृष्णा अभिषेक दिसला होता. परंतु शो सुरु झाल्यानंतर तो गायब दिसला. त्यांनतर फीमुळे त्याने शो सोडल्याचा रिपोर्ट समोर आला होता. दरम्यान आता आणखी एका कॉमेडियन कलाकाराने कपिलची साथ सोडल्याचं समोर आलं आहे.
या कॉमेडी शोमधून अनेक कलाकारांनी एक्झिट घेत नव्या प्रोजेक्ट्समध्ये वर्णी लावली होती. कपिल शर्माचा खास मित्र आणि कॉमेडियन चंदन प्रभाकरनेही शो मध्येच सोडला होता, कारण त्याने नवीन चित्रपट साइन केला होता. आता आणखी एका कलाकाराने या शोला अलविदा केल आहे. ई टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन सिद्धार्थ सागरने कपिल शर्मा शो सोडला आहे.

सिद्धार्थ ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सेल्फी मौसी, उस्ताद घरचोरदास, फनवीर सिंग आणि सागर पगलेटू यांसारख्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच मनोरंजन करत होता. सिद्धार्थचा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत होता. सिद्धार्थच्या शो सोडण्यामागील कारण मानधन असल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थचा मानधनाबाबत शोच्या निर्मात्यांसोबत मतभेद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थला त्याची फी वाढवायची होती, पण निर्माते त्याच मानधन वाढवायला तयार नव्हते. त्यामुळेच त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘द कपिल शर्मा शो’च्या शूटिंगसाठी मुंबईत शिफ्ट झालेला सिद्धार्थ आता पुन्हा दिल्लीतील त्याच्या घरी परतला आहे.
त्यामुळे तो शोमध्ये पुन्हा येणार की नाही याबाबत शंका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button