जीवनशैली

दारु प्यायल्यानंतर व्यक्ती शरीरावरील नियंत्रण का गमावून बसतो, कारण…?

आरोग्य : अनके लोक मज्जा म्हणून दारू पितात. दारूच्या नशेतील या व्यक्ती तोंडातून अशा अनेक गोष्टी बोलून जातो ज्या कधी बोलायच्या नसतात. तर अनेकदा असे काही वागतो जे आपल्यासाठीही खूप शॉकिंग असते. या नशेत अनेकजण आपल्या संसार, चांगले नातेसंबंध तोडून बसतो. पण तुम्ही कधी विचार केला का दारु प्यायल्यानंतर व्यक्ती आपल्या शरीरावरील नियंत्रण का गमावून बसतो? तसेच तो स्पष्टवक्तेपणाने कसा बोलू लागतो? जाणून घ्या मागील शास्त्रीय कारण .

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दारू प्यायल्यानंतर शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. याचा मेंदूच्या न्यूरॉन्सवरही थेट परिणाम होतो, यात मेंदूच्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणारे न्यूरॉन्स हळूहळू कमी होतात. यामुळे मेंदूची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते. यामुळे दारु पिऊन मन नियंत्रणात राहत नाही.

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोहोलिझमच्या अहवालानुसार, दारु थेट मेंदूपर्यंत जाते. दारु पिऊन बेशुद्धावस्थेत असताना मेंदूचा हिप्पोकॅम्पस नावाचा भाग काही काळ बिघडतो. हिप्पोकॅम्पस हा तो भाग आहे जो सर्व प्रकारची माहिती मेमरीसाठी फाईलच्या स्वरुपात साठवतो.

सतत मद्यपान केल्याने आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते. परंतु मध्यम किंवा जास्त मद्यपान केल्याने मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल तुमच्या शरीरावर थेट परिणाम करतो, कारण ते तुमच्या पोटाच्या अस्तरातून तुमच्या रक्तप्रवाहात शोषले जाते. एकदा ते रक्तप्रवाहात पोहोचले की ते संपूर्ण शरीरात ऊतकांमध्ये पसरते. अल्कोहोल मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात आणि तुमची मेंदूची क्षमता बिघडते. साधारणपणे २० मिनिटांनंतर जेव्हा यकृत अल्कोहोलवर प्रक्रिया करण्यास सुरवात करते, तेव्हा यकृत खराब होऊ लागते. डॉक्टरांच्या मते, अल्कोहोल ८० तासांपर्यंत लघवीत राहते तर केस आणि follicles मध्ये तीन महिन्यांपर्यंत राहते. यामुळे पचन क्षमता बिघडते.

अल्कोहोलचा मेंदूवर कसा परिणाम होतो?

संपूर्ण शरीरावर अल्कोहोलचा परिणाम होत असतो पण याच मेंदूचे जास्त नुकसान हते. अल्कोहोल मेंदूच्या संप्रेषण प्रणालीमध्ये हस्तक्षेप करते आणि माहिती प्रक्रिया देखील कमी करते.

नशेचा पहिला टप्पा – जेव्हा रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.०१-०.०५ च्या दरम्यान असते, तेव्हा तो नशेचा पहिला टप्पा म्हणून गणला जातो. यात तुम्ही मद्यपान करत असल्यासारखे दिसत नाही, परंतु तुमची वागणूक आणि निर्णयात थोडासा बदल जाणवू लागतो.

दुसरा टप्पा – हे मद्यपानाच्या सुरुवातीच्या काळात होते जेव्हा तुमचा मेंदू अधिक डोपामाइन सोडतो, हे रसायन आनंदाशी संबंधित आहे. तुम्हाला आराम वाटत असला तरीही, तुमच्या मेंदूची तर्कशक्ती आणि स्मरणशक्ती अधिक बिघडते, यावेळी रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.०३-०.१२ दरम्यान असते.

तिसरा टप्पा – एकदा तुम्ही या टप्प्यावर पोहोचलात की, रक्तातील अल्कोहोलचे प्रमाणही ०.०९ ते ०.२५ पर्यंत पोहोचते आणि तुम्हाला नशा येते. नशेची ही पातळी तुमच्या मेंदूच्या ओसीपीटल लोब, टेम्पोरल लोब आणि फ्रंटल लोबवर परिणाम करते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने दृष्टी अंधुक होणे, बोलण्यात, ऐकण्यात अस्पष्टता, नियंत्रणाचा अभाव यासह अनेक बदल दिसू लागतात. यावेळी माणसाचे स्वत:च्या शरीरावर नियंत्रण राहत नाही.

चौथा टप्पा – या अवस्थेत मेंदू समन्वय गमावतो आणि त्याचा गंभीर परिणाम होतो आणि तुम्हाला ब्लॅकआउट किंवा अल्पकालीन स्मरणशक्ती कमी होऊ शकते.

डॉक्टरांच्या मते, अल्कोहोलसाठी एखाद्या व्यक्तीची शरीराची प्रतिक्रिया अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये वय, लिंग, आरोग्य आणि पिण्याचे प्रमाण या गोष्टींचा समावेश होतो.

दिवसातून अनेकदा दारू पिणाऱ्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोगाचा धोका जास्त असतो. यामुळे अनेकदा वाढत्या हिंसाचार आणि अपघातांच्या घटना घडतात. दीर्घकाळ मद्यपान केल्याने आरोग्यावर खरोखर वाईट परिणाम होतो. यात नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button