क्रिडाविश्व

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटीतील लढत इंदूरमध्ये होत आहे आहे. या तिसऱ्या कसोटीतील नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. केएल राहुलला अखेरीस संघातून वगळण्यात आले आहे. तर अजून एक संघात बदल करण्यात आला आहे.

जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट लक्षात घेऊन इंदूरची कसोटीत टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. भारतीय संघात मोठा बदल केएल राहुलच्या रूपाने झाला आहे, ज्याला संघातून वगळण्यात आले आणि शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी, दुसरा बदल गोलंदाजीमध्ये आहे, ज्यामध्ये मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादव खेळेल.

असूत्रातीलचा बराचसा संघ या ना त्या कारणास्तव मायदेशी परतला आहे. काही खेळाडू जखमी आहेत तर काही दुसऱ्या कारणास्तव घरी परतले आहेत. त्यामुले ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे बदललं आहे. यावेळेस ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हातात आहे. तर मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीनचे संघात पुनरागमन झाले आहे.

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने पुढे आहे. म्हणजे तो आता मालिका गमावणार नाही. गतविजेता असल्याने ट्रॉफीही टीम इंडियाकडे राहणार आहे. पण, तरीही इंदूर कसोटीतील विजय त्यांच्यासाठी आवश्यक आहे आणि कारण येथील विजयामुळे भारत जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकणार आहे.

ऑस्ट्रेलिया:
उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन

भारत:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button