महाराष्ट्र

समृद्धी महामार्ग आणखी १० महिने रखडणार; डाेंगराळ भागामुळे ठाणे जिल्ह्यातील कामात अडसर

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

तथापि, ही अंतिम मुदत चुकण्याची शक्यता आहे. आमने ( भिवंडी आणि कल्याणजवळील शेवटचा बिंदू )पर्यंतचाच मार्ग मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण एक्स्प्रेस वे मार्च २०२४ पूर्वी पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीवर दबाव आहे. या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहितेमुळे औपचारिक उद्घाटन शक्य होणार नाही.
नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटरचा महामार्ग सध्या खुला आहे. शुक्रवारी शिर्डी ते भरवीर दरम्यानचा आणखी ८० किमीचा मार्ग खुला होईल. जुलैअखेरपर्यंत पिंपरी सदरोद्दीन (इगतपुरीजवळ, भरवीरपासून आणखी २० किमी) पर्यंत काम पूर्ण होण्याची एमएसआरडीसीला आशा आहे. वाशाळा बुद्रुक ( ता. शहापूर, जि. ठाणे ) पर्यंत मार्ग खुला होण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. डोंगराळ भूभागामुळे या भागावर पॅकेज १४ बांधकाम करणे आव्हानात्मक होते. वाशाळा बुद्रुक ते आमणे दरम्यानच्या शेवटच्या ६५ किमीच्या अंतरासाठी काही अवधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. डोंगराळ भूभाग आणि आणि रस्ता सह्याद्रीच्या डोंगरातून खाली येत असल्याने येथे अडचणी निर्माण होत आहेत.

अंतिम मुदत वाढलेली नाही
 वाशाळा बुद्रुक ते आमणेदरम्यानचा भाग दोन पॅकेजमध्ये विभागला गेला.
 पॅकेज १५ हे वाशाळा बुद्रुक ते बिरवाडी (२८ किमी) आणि पॅकेज १६ हे बिरवाडी ते आमणे (३७ किमी) आहे.
 २०२०च्या उत्तरार्धात या पॅकेजवर काम सुरू झाले.
 आमणेपर्यंत महामार्ग पूर्ण करण्याबाबत एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव म्हणाले की, मार्च २०२४ पर्यंत अंतिम मुदत वाढलेली नाही.
 महामंडळ तो डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button