मनोरंजन 

माझे वडील हे राजा माणूस होते. शेवटपर्यंत ते ऐटीत जगले…गश्मीरने सांगितली सत्याची दुसरी बाजू

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मराठी सिनेसृष्टीचे देखणे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. याशिवाय त्यांचे निधन जास्त चर्चेत आले ते म्हणजे त्यांच्या कुटुंबामुळे. कारण त्यांचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील कोणीच सदस्य त्यांच्यासोबत नव्हते. किंबहूना निधनानंतर २/३ दिवसांनी त्यांना ही बातमी समजली होती. त्यामुळे लोकांनी वेगवेगळे अंदाजही बांधायला सुरुवात केली होती.

ही सर्व सत्याची एक बाजू असली तरी त्याची दुसरी बाजू रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी याने मित्र म्हणे या युट्यूब चॅनला दिलेल्या मुलाखतीत समोर आणली. त्याने या मुलाखतीत त्याचे वडील कुटुंबापासून २० वर्षांपूर्वीच वेगळे राहत असल्याचे सांगितले.

गश्मीरच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याच्या वडीलांना गमावल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेख जे त्यांच्यासंबंधी किंवा त्यांच्या कुटुंबासंबंधी लिहून आलेले वाचले. त्यात त्यांना बिचारे, हालाखीच्या परिस्थितीत राहणारे, कुटुंबाने वेगळं केलेले असे उल्लेख केले होते. पण ते तसे नव्हते. गश्मीर म्हणाला की, माझे वडील हे राजा माणूस होते. शेवटपर्यंत ते ऐटीत जगले. त्यांनी कधीच कोणाची मदत घेतली नाही. स्वत:ची काळजी घेण्यासाठी ते समर्थ होते. त्यांनी तशी ती सवय होती. त्यांचा तो स्वभाव होता.

लोकांनी गश्मीरला आपल्या वडीलांची काळजी न घेतल्याची किंवा त्यांच्या संरक्षणाची काळजी न घेतल्याचेही आरोप केले. यावर व्यक्त होत गश्मीर म्हणाला की, त्यांना कधीच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षतेची गरज नव्हती.त्यांना साधं कोणी मदतीसाठी विचारलं जरी असतं तरी त्यांनी त्याच्या मुस्काटात मारुन त्याला परत पाठवलं असतं. ते खूप खंबीर होते. त्यांच्याकडे कायम परवाना असलेली आणि जीवंत गोळ्या असलेली बंदूक असायची. जी आम्हाला पोलिसांनीच त्यांच्या मृत्यूनंतर दिली. आता त्यांचे डेथ सर्टिफिकेट आल्यावर मी ती त्यांना पुन्हा देणार आहे. ते एकदम राजा माणसारखेच जगले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button