भारत
सरकारी बंगला पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; “संपूर्ण भारत हे माझं घर’..”
राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यानंतर आता राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला देखील मिळाला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला मिळाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा प्रशासनाकडून राहुल गांधी यांना मंगळवारी तुघलक लेनवरील बंगला देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांना २२ एप्रिल २०२३ रोजी १२ तुघलक लेन येथील बंगला रिकामा करावा लागला होता.



